मुख्य बातमी

टाकाऊ वस्तुंची कलाकृती स्पर्धा (Waste to Art)

स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ०२ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस (SBD) म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने स्वच्छता ही सेवा (SHS) मोहिम दि.१४ सप्टेंबर २०२४ ते ०२ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात येत आहे. या वर्षीच्या स्वच्छता ही सेवा २०२४ साठी “स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता” ही थीम केंद्र शासनाने निश्चित केली आहे. त्यानुसार स्वच्छता की भागीदारी अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व नागरिक, ग्रामपंचायत परिक्षेत्रातील उद्योग, समूह यांच्यासाठी स्पर्धेचे नियोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेसाठी खालील मुद्यांच्या आधारे नियोजन करण्यात येणार आहे.

सहभागाकरिता निकष :

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थ, ग्रामपंचायत परिक्षेत्रातील उद्योग, समुह. ग्रामपंचायत परिक्षेत्रातील उद्योग नोंदणीकृत असणे आवश्यक. तसेच ग्रामस्थांकरिता रहिवासी दाखला.

सहभागाकरिता नोंदणी :

ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थ, ग्रामपंचायत परिक्षेत्रातील उद्योग, समुह यांनी मा. गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे अर्ज सादर करावा. (अर्जाचा नमुना जिल्हा परिषद संकेतस्थळ (www.zpratnagiri.org) वर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. अर्जासोबत ग्रामपंचायत परिक्षेत्रातील उद्योग नोंदणीकृत असल्याबाबतचा दाखला व ग्रामस्थांकरिता रहिवासी दाखला सादर करावा.

ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थ, ग्रामपंचायत परिक्षेत्रातील उद्योग, समुह यांनी स्वच्छता विषयक केलेल्या कामांचा अहवाल (मुल्यमापनाच्या निकषानुसार) सादर करावा. (अर्जासोबत)

स्पर्धेचा कालावधी :

१) Waste to Art स्पर्धेची प्रसिद्धी – दि.१४/०९/२०२४ ते दि.१७/०९/२०२४

२) नोंदणी (अर्ज सादर करण्याची मुदत) – दि.२०/०९/२०२४ रोजी सांय. ५.०० वा. पर्यंत

३) तालुकास्तरीय तपासणी – दि. २५/०९/२०२४ ते दि. २६/०९/२०२४

४) तालुकास्तरीय निकाल – दि.२७/०९/२०२४

५) जिल्हास्तरीय तपासणी – दि.२९/०९/२०२४ ते दि.३०/०९/२०२४

६) जिल्हास्तरीय निकाल – दि.०१/१०/२०२४

७) पारितोषिक वितरण – दि.०२/१०/२०२४

मुल्यमापनाचे निकष :

– सर्जनशीलता आणि मौलिकता (Creativity & Originality)

✓ टाकाऊ पदार्थ वापरण्याची अनोखी संकल्पना आणि दृष्टीकोन.

✓ सामग्रीचे नाविन्यपूर्ण परिवर्तन जे कल्पनाशक्ती दर्शवते.

✓ मूळ कल्पना ज्या कलाकृतीला इतरांपेक्षा वेगळे करतात.

– टाकाऊ पदार्थाचा वापर (Use of Waste Materials)

✓ कलाकृतीमध्ये किती प्रमाणात टाकाऊ पदार्थाचा समावेश केला जातो.

✓ पुनर्नवीनीकरण (recycled) केलेल्या वस्तूंचा योग्य वापर (जितके जास्त कचरा, तितके चांगले).

✓ टाकून दिल्या जाणाऱ्या वस्तूंचे क्रिएटिव्ह (Creative repurposing of objects) पुनर्प्रयोजन.

– कारागिरी आणि अंमलबजावणी (Craftsmanship & Execution)

✓ कामाच्या दृष्टीने वस्तुची गुणवत्ता आणि तपशीलाकडे लक्ष.

✓ वस्तु तयार करण्यासाठी सामग्रीची कुशल हाताळणी.

✓ कलाकृतीची टिकाऊपणा आणि दृढता.

– पर्यावरण संदेश (Environmental Message)

✓ कलाकृती पर्यावरणीय किंवा टिकावू संदेश किती चांगल्या प्रकारे संप्रेषित करते.

✓ पुनर्वापराचे महत्त्व, कचरा कमी करणे आणि टिकाऊपणाचे प्रतिबिंब,

✓ कलाद्वारे पर्यावरणीय समस्यांबद्दल जागरूकता वाढविण्याची क्षमता.

– सौंदर्यविषयक आवाहन (Aesthetic Appeal)

✓ कलाकृतीचा एकूणच दृश्य प्रभाव.

✓ रंग, फॉर्म, पोत आणि रचना यांचा प्रभावी वापर.

✓ दर्शकांना मोहित करण्याची किंवा गुंतवून ठेवण्याची कलाकृतीची क्षमता.

– साहित्य वापरातील नावीन्य (Innovation in Material Use)

✓ कार्यशील किंवा दिसायला आकर्षक असे काहीतरी तयार करण्यासाठी टाकाऊ पदार्थांचा अपारंपरिक वापर.

✓ विविध प्रकारचे कचरा एकत्रित कलाकृतीमध्ये एकत्रित करण्याचे कल्पक मार्ग.

– वैचारिक खोली (Conceptual Depth)

✓ निर्मितीमागील विचारांची खोली.

✓ प्रभाव आणि संप्रेषण (Impact & Communication)

– समकालीन पर्यावरणीय किंवा सामाजिक समस्यांशी संकल्पनेची प्रासंगिकता.

✓ कचरा आणि पर्यावरणविषयक चितांच्या संदर्भात विचार किंवा भावना भडकवण्याची

– प्रभाव आण सप्रषण (Impact & Communication)

✓ कचरा आणि पर्यावरणविषयक चितांच्या संदर्भात विचार किंवा भावना भडकवण्याची कलाकृतीची क्षमता.

✓ महत्त्वाच्या पर्यावरणीय विषयांवर प्रेक्षकांसह व्यस्तता.

– प्रेझेंटेशन (Presentation)

✓ कलाकृती प्रदर्शनासाठी किती चांगल्या प्रकारे सादर केली गेली आहे (स्वच्छता, अंतिम स्पर्श).

✓ कलाकृतीची मांडणी किंवा प्रदर्शन कसे केले जाते याचा विचार.

निवड प्रक्रिया :

प्रथम मुल्यमापन तालुकास्तरीय समितीमार्फत केले जाईल.

मुल्यमापनामध्ये दिलेल्या निकषानुसार व त्यासाठी असलेल्या गुणानुसार गुणानुक्रम देण्यात येईल. गुणानुक्रमानुसार तालुकास्तरावर प्रथम येणा-यांची निवड जिल्हास्तरीय तपासणीसाठी करण्यात येईल. त्यांची तपासणी जिल्हास्तरीय समिती मार्फत केले जाईल.

मुल्यमापनामध्ये दिलेल्या निकषानुसार व त्यासाठी असलेल्या गुणानुसार जिल्हास्तरीय समितीमार्फत गुणानुक्रम देण्यात येईल.

गुणानुक्रमानुसार जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्यांना पारितोषिक दिले जाईल.

पारितोषिक जिल्हास्तर :

प्रथम – २५,०००/-

द्वितीय – १५,०००/-

तृतीय – १०,०००/-

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व नागरिक, ग्रामपंचायत परिक्षेत्रातील उद्योग, समुह यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन स्वच्छता ही सेवा २०२४ अभियान यशस्वी करावे असे आवाहन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button