मुख्य बातमी
रत्नागिरीत जिल्हा प्रशासनामार्फत ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रा

रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ व्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनामार्फत जय शिवाजी जय भारत या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम ते पेठकिल्ला शिवसृष्टी अशी या रॅलीची मार्गक्रमणा होती. जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांतअधिकारी जीवन देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.




