जिल्हास्तरीय कै.अच्युतराव पटवर्धन वक्ता दशसहस्त्रेषु वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळ, रत्नागिरीतर्फे आयोजित कै. अच्युतराव पटवर्धन स्मृती समारोहांतर्गत कै. अच्युतराव पटवर्धन वक्ता दशसहस्त्रेषु जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा झाली. या स्पर्धेमध्ये सहावी ते आठवी गटात तपस्या गुरुप्रसाद बोरकर, नववी ते बारावी गटात तृप्ती आप्पासो मदने तसेच शिक्षक गटात माधव विश्वनाथ अंकलगे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
रविवारी स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रत्नागिरी आकाशवाणी केंद्राचे केंद्रप्रमुख सुहास विद्वांस होते. भारत शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य प्रमुख उपस्थित होते. सुनीता गाडगीळ यांनी पाहुण्यांचा व परीक्षकांचा परिचय करून दिला. कार्यवाह दादा वणजू यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले, तर इतर मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर यांनी केले. स्पर्धेच्या नियमावलीचे वाचन मानसी चव्हाण यांनी केले.
स्पर्धेत ६ वी ते ८ वी, ९ वी ते १२ वी आणि शिक्षक गट अशा तीन गटांमध्ये स्पर्धकांनी भाग घेतला. परीक्षक म्हणून संतोष गार्डी, दीपिका भावे, विजय गावडे, क्षमा पुनस्कर, प्रा. अंजली बर्वे, डॉ. शंकर जाधव यांनी काम पाहिले. स्पर्धा संपल्यानंतर बक्षीस वितरण समारंभ राजेंद्रप्रसाद मसुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या कार्यक्रमाला भारत शिक्षण मंडळाचे सदस्य विनायक हातखंबकर, अनंत आगाशे, दादा कदम आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
स्पर्धेतील विजेत्यांची नावेः- इ. ६ वी ते ८ वी गट – प्रथम: तपस्या गुरुप्रसाद बोरकर, द्वितीय: माही गिरीष वनकर, तृतीय: देवांसी आशिष चौघुले, उत्तेजनार्थ: मुक्ता मोहन बापट व धनश्री विजय करोडे, इ.९ वी ते १२ वी गट : प्रथम: तृप्ती आप्पासो मदने, द्वितीय: बिल्वा गणेश रानडे, तृतीय: हर्षवर्धन आप्पासो मदने, उत्तेजनार्थ: विधी सत्यजित कापडी व यज्ञा संदेश सप्रे. शिक्षक गट : प्रथम: माधव विश्वनाथ अंकलगे, द्वितीय: विक्रांत वसंत टेरवकर, तृतीय: आप्पासाहेब ईश्वर मदने, उत्तेजनार्थ : सौ. प्राची प्रदीप राव व सौ. वैशाली बाबुराव खरात. कार्यक्रमाच्या शेवटी स्पर्धा प्रमुख प्रा. मानसी चव्हाण यांनी आभार मानले.



