मुख्य बातमी
बावनदीजवळ अपघात; दोघे ठार

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बावनदीजवळ सळई वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झाला असून यात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे.

रखडलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाबाबत गेल्या अनेक वर्षांपासून ओरड सुरू आहे. कालपासून सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून या रखडलेल्या महामार्गाच्या कामाची पाहणी देखील सुरू झाली आहे. अशातच आज (२१ फेब्रुवारी) सकाळी बावनदीनजीक ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे.



