मुख्य बातमी

रत्नागिरीत होत असणाऱ्या सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी ५०० जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू

विविध प्रकल्पांतून ३८ हजार तरुणांना मिळणार रोजगार!

रत्नागिरी : येथे होत असलेल्या एशियातील पहिल्या सेमी कंडक्टर प्रकल्पासाठी ५०० जागांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याविषयीची जाहिरात वृत्तपत्रातील कंपनीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नाने पहिल्या टप्प्यामध्ये ५०० तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे.

यास प्रकल्पांतर्गत दीड हजार तरुणांना परदेशात प्रशिक्षणासाठी देखील पाठवण्यात येणार आहे. सेमिकंडक्टरमध्ये तैवान, चीन आणि हाँगकाँग यांची मक्तेदारी आहे. या सर्वांचा लिडर म्हणून तैवानकडे पाहिले जाते. इथून पुढे मेड इन इंडिया म्हणून या प्रकल्पातील उत्पादन नावारूपाला येतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button