मुख्य बातमी

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार?

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली माहिती

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (२९ सप्टेंबर) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी निवडणुकांविषयी भाष्य केले. निवडणूक जाहीर करण्यापूर्वी आयोगाने गेल्या दोन दिवसांपासून ११ राजकीय पक्षांशी चर्चा केली. या चर्चेत सण उत्सव पाहून निवडणुका घोषित करा, आठवड्याच्या मध्यामध्ये म्हणजे शनिवार, रविवार सोडून मतदान घ्यावे, असे राजकीय पक्षांनी म्हटले. फेक न्यूज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात, त्यावर नियंत्रणाची मागणी राजकीय पक्षांनी केली, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. या सर्व गोष्टींवर आयोगाने विचार केला आहे. निवडणुका एका टप्प्यात होणार की दोन टप्प्यात होणार हे आम्ही लवकरच स्पष्ट करू, असे निवडणूक आयुक्तांनी यावेळी सांगितले.

२६ नोव्हेंबर रोजी विधान सभेचा कार्यकाळ संपणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात सध्याच्या घडीला ९.५९ कोटी मतदार असून पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या १९.४८ लाख आहे. महाराष्ट्रत एकूण १,००,१८६ पोलिंग बूथ असून यात अर्बन बूथची संख्या ४२,५८५ तर रूरल पोलिंग बूथची संख्या ५७,६०१ इतकी आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच महाराष्ट्र दौरा केला. यानंतर त्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. केंद्रीय निवडणूक आयोगाने जवळपास १४ राजकीय पक्षांसोबत बैठक घेतली. यात दिवाळी आणि इतर उत्सवाला लक्षात घेता निवडणूक जाहीर करण्यात यावी अशी नेत्यांची भूमिका होती. तसेच मतदारांसाठी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी पक्षांकडून करण्यात आली.

राज्यात एकूण २८८ विधानसभा मतदारसंघांत निवडणूक होत आहे. त्यासाठी, राज्यात पुरुष मतदार ४.९५ कोटी आणि स्त्री मतदार ४.६४ कोटी आहेत, थर्ड जेंडर म्हणजेच तृतीयपंथी मतदारांची संख्या ५९९७ असून राज्यातील दिव्यांग मतदार ६.३२ लाख एवढे आहेत. यंदा पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवयुवकांची संख्या म्हणजे नव मतदार १९.४८ लाख एवढे आहेत. राज्यांत महिला मतदारांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून १०.७७ लाख मतदार आहेत.

शहरातील मतदान बुथ केंद्रांची संख्या ४२ हजार ५८५, तर ग्रामीण महाराष्ट्रात ५७ हजार ६०१ मतदान बुथ केंद्र असणार आहेत. काही ठिकाणी तरूण अधिकारी बूथ मँनेज करतील. ३५० असे बूथ असतील जिथे तरुण अधिकारी बूथ मॅनेज करतील. लोकसभा निवडणुकीत कमी मतदान क्षेत्र असेलल्या कुलाबा, कल्याण, कुर्ला, मुंबादेवी इथ मतदान कमी झाले आहे. गडचिरोली येथे ७३ टक्के मतदान झाले, मग कुलाबा कल्याण येथे मतदानाचा टक्का वाढायला हवा. इथल्या मतदारांनी विचार करायला हवा,असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

निवडणूक आयोगाच्यावतीने सुविधा पोर्टल नावाने अँप जारी करण्यात आले आहे. या एप्लिकेशन्सवर मतदारांना तक्रार करता येणार आहे. एखाद्या ठिकाणीं काही घटना घडली किंवा उशीरापर्यंत मतदान सुरु असेल तर केवळ फोटो काढून या एप्लिकेशन्सवर अपलोड केला की, ९० मिनिटांत निवडणूक आयोगाची टीम तिथे पोहचेल, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. एटीएमसाठी पैसै घेऊन जाणाऱ्या गाडीला निवडणुक काळात रात्री ६ ते सकाळी ८ पर्यंत पैसे वाहतूक करता येणार नाही. याकाळात अँब्युलन्स, बँक आणि पतसंस्थांवर देखील लक्ष ठेवले जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button