महाराष्ट्र राज्यमुख्य बातमी

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील १२जिल्हा परिषदेच्या निवडणुका ५फेब्रुवारीला

७ फेब्रुवारी रोजी होणार मतमोजणी 

मुंबई :- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून राज्यातील १२ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील १२ जिल्हा परिषदेच्या निवडणुका ५ फेब्रुवारी रोजी होणार आहेत.

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

१६ जानेवारी २१ जानेवारी अर्ज दाखल करणे,

२२ जानेवारी रोजी होणार छाननी,

२७ जानेवारी ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख

५ फेब्रुवारी रोजी मतदान होईल

७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

२५ हजार ४८२ मतदान केंद्र, राहणार असून १२ जिल्हा परिषदेत ४३१ सदस्यांची निवडणूक होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button